जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगर स्मशानभूमिजवळील रेल्वे लाईनला लागून असलेल्या डी.पी. रोडसाठी मनपाने जागेचे भूसंपादन केले होते. या जागेचा वाढीव मोबदला मनपा महापालिका अदा करत नसल्याने मनपा आयुक्तांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार वकील व बेलिप महापालिकेत जप्तीसाठी आले असता महापालिका प्रशासनाने तातडीने २५ लाखांचा धनादेश कोर्टात दिला त्यामुळे आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई तुर्त टळली आहे.
शिवाजीनगर परिसरातील गट नं. ५११ सीटी सर्वे नं. २७१० ही जागा महापालिकेने डीपी रस्त्यासाठी भूसंपादीत केली आहे. या जागेच्या वाढीव मोबदल्यात सव्वा तीन कोटी रुपये अदा करण्याचे आदेश महापालिकेला झाले होते. त्यावेळी मनपाने ८८ लाख रुपये अदा केले परंतु उर्वरीत मोबदला अदा न केल्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने जळगाव महापालिकेचे आयुक्त यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी जागा मालक हितेंद्र मोहनलाल मेहता यांचे वारस उष्मा हितेंद्र मेहता यांचे वकील अॅड. नारायण लाठी व न्यायालयाचे बिलिफ पाटील आणि चंदनकर यांनी दुपारी महापालिका गाठली. यावेळी महापौरांच्या दालनात त्यांनी आयुक्तांशी चर्चा करून खुर्ची जप्त करण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यासह मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगररचना विभागाचे प्र. सहाय्यक संचालक अमोल पाटील, मुख्य लेखा परिक्षक विजय कुमार सोनवणे, मनपाचे वकील अॅड. आनंद मुजुमदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेचा भोंगळ कारभार
आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी आलेल्या वकिलांसह कोर्टाचे बिलीफ यांच्याशी चर्चा करतांना उपस्थित अधिकाऱ्यांना देखील याप्रकरणाची सखोल माहिती नसल्याचे दिसून आले. मनपाच्या अधिकाऱ्यांना विषयाचे गार्भिय नसून मनपात मोठा भोंगळ कारभार सुरु असल्याचे दिसून आले. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मनपाचे वकील आनंद मुजूमदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांना संपुर्ण प्रकरण सांगता आले नाही, हे प्रकरण माझ्याकडे नाही, असे सांगून त्यांनी असमर्थता दर्शवली. तसेच नगररचना विभागाचे प्र. सहाय्यक संचालक अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याकडे अशी अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे नेमकं भूसंपादन कधी झालं, किती मोबदला आतापर्यंत दिला, याविषयी पुर्ण माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. लेखापरिक्षक विजय कुमार सोनवणे यांना विचारणा केली असता त्यां देखील आपल्याला माहीत नसल्या सांगितले. एकीकडे या प्रकरण मनपाकडून २५ लाखांचा धनादे देण्यात येतो मात्र, लेखाधिकारी त लेखा परीक्षक सांगतात मला माहि नाही, त्यामुळे मनपात किती मोन गोंधळ सुरु आहे याची प्रचिती येते.
चार वर्षापुर्वी झाले आदेश
सदर जागेच्या वाढीव मोबदला देण्याच आदेश न्यायालयाने ४ वर्षापुर्वीच दिल होता. परंतु महापालिका प्रशासनाकडून रक्कम अदा न करता वारंवार मुदत देवूनह टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळ न्यायालयाने महापालिकेच्या आयुक्तां वाहन, खुर्चीसह इतर साहित्य जप्तीचे वॉर काढले होते. त्यामुळे शुक्रवारी वकील अॅड. लाठी व न्यायालयाचे बेलिफ जप्तीच्या कारवाईसाठी मनपात धडकले होते.
















