मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचीही माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा रद्द निर्णय घेतल्याची माहिती दिली. मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याविषयावर मत मांडले. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रत्यक्ष पद्धतीनं शाळा भरल्या नाहीत. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये ती पुढे ढकलण्यात आली आहे त्याप्रमाणं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळानं तो निर्णय मान्य केला, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले, ऑक्सिजन हा कळीचा मुद्दा आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन निर्माण करणारे थर्मल पॉवर स्टेशन आहेत. परंतु ते थेट रुग्णांना देत नाही. रुग्णांना ते देण्यासाठी लिक्विज फॉर्ममध्ये बॉटलिंग करणे आवश्यक असते. त्यामुळे बॉयलिंग प्लांट लवकरात लवकर टाकायचे असे महाराष्ट्रात सहा ठिकाणे आहे. या सहा ठिकाणांवर त्वरीत टाकण्यात येणार आहे.