धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जांभोरा आणि बिलखेडा या गावातून ५ बैल चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दीपक मधुकर सपकाळे हे जांभोरा गावाचे रहिवाशी असून तेथे शेती करतात. त्यांनी २ बैल जांभोरा शिवारातील शेत गट नंबर ३२७ मध्ये पळसाच्या झाडाखाली बांधली होती. तर भगवान पंडित पाटील (रा. बिलखेडा) यांनी त्यांच्या मालकीची खळ्यात ३ बैल बांधलेली होती. दोघं जण दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बैलांना नेहमीप्रमाणे चारा-पाणी करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी अर्थात ४ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास आल्यावर अज्ञात चोरट्यांनी ५ बैल चोरून नेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दिपक पाटील हे करीत आहेत. दरम्यान, पारोळा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळतेय. या दोघांनीच धरणगाव तालुक्यातील बैल चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.