चोपडा (प्रतिनिधी) राज्यातील आजचा राजकीय भूकंप होणे अपेक्षित होते. परंतु अजितदादांसोबत एवढे आमदार जातील हे शक्य वाटत नव्हते. त्यामुळे मी अजित दादांबरोबर जायचं की शरद पवारांबरोबर राहायचं?, याचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसात कार्यकर्त्यांशी व जनतेशी चर्चा केल्यानंतर घेऊ, अशी प्रतिक्रिया अरुणभाई गुजराती यांनी दिली आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीत घमासान सुरू झाल्याचं चित्र आहे. शरद पवारांनी या बंडखोर नेत्यांना पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अगदी महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्याचेही राजकारण ढवळून निघाले आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे शरद पवारांचे खंदे समर्थक माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराती यांची प्रतिक्रिया विचारली असता राजकीय भूकंप होणे अपेक्षित होते. परंतु एवढे आमदार अजितदादा यांच्याबरोबर जातील हे शक्य वाटत नव्हते. त्यामुळे मी अजित दादांबरोबर जायचं की शरद पवारांबरोबर राहायचं याच्या निर्णय येत्या दोन-तीन दिवसात कार्यकर्त्यांशी व जनतेशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे अरुण भाई गुजराती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.