मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडले. यावेळेस गुरुवारी शिवसेनेतील आणखी पाच आमदार गुवाहाटीला जाऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. शिवसेना विधिमंडळ पक्षात कायदेशीर फूट पाडण्यास सुरुवात झाली.
बंडातील आमदारांची एकूण संख्या ४६ झाली आहे. विधिमंडळातील दोन तृतीयांश आमदारांचे म्हणजेच पक्षाच्या ५५ पैकी ३७ आमदारांचे संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यापाशी झाले आहेत. शिवसेनेचे ९ सहयोगी अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना व अपक्ष आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. शिवसेनेच्या या आमदारांच्या पळापळीमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे कारण सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मंगळवारी बंडाचा झेंडा पुकारला. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले.बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आघाडीत असणारे . माहीममधील आमदार सदा सरवणकर हे शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.कृषीमंत्री दादा भुसे हे वर्षां निवासस्थानी बुधवारी बैठकीला उपस्थित होते.
याशिवाय मुंबईतील मंगेश कुडाळकर, कोकणातील दीपक केसरकर, माजी वनमंत्री संजय राठोड हे आमदार गुरुवारी दिवसभरात एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले.शिवसेना आमदारांची संख्या ३७ वर पोहोचली. याशिवाय एकूण ९ अपक्ष आमदार सोबत असल्याची यादी आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींमुळे सर्वांचे लक्ष आता काय असेल याकडे लागले आहे.