चोपडा (प्रतिनिधी) निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे याने आज झाडावर चढून अनोखे आंदोलन कले. आंदोलनाला पंचक्रोशीतील हजारावर नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून पाठिंबा दिला.
निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना पाठवून आंदोलनाचा इशारा उत्वेश साळुंखे यांनी दिला होता. मात्र, मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालावे व सदर प्रश्नावर वेळ द्यावी याकरिता झाडावर बसून लाक्षणिक आंदोलन केले. उर्वेश साळुंखे यांनी सकाळी ग्राम दैवताचे दर्शन घेवून आंदोलन स्थळी मार्गक्रमण केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेकडो ग्रामस्थ हजर होते. सदर आंदोलन सुरू होताच माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी आंदोलन स्थळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली.
आंदोलक साळुंखे यास झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली तसेच मा. जि. प.सदस्य सुनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ना.अजित पवार यांनी लवकरच मंत्रालय येथे सदर प्रश्नावर भेट देण्याचे आश्वासनं दिले. तर डॉ. चंद्रकात बारेला, मा. चेअरमन अतुल ठाकरे, तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील बबलु बोरसे संरपच रविंद्र सोनवणे ग्रामपंचायत सदस्य यशवंत सोनवणे, कैलास कोळी, समाधान बाहरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्की डॉ , रामकृष्ण पाटील यांचेसह गावातील नागरिकांनी केलेल्या विनंतीस मान देऊन दुपारी झाडावरून खाली उतरवले गेले.
याप्रसंगी या धाडसी व अनोख्या आंदोलनाला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,हिरामण कंखरे, रणजित शिंदे, सुनिल पाटील,देविदास देसले आदींनी अमळनेर येथून येवून भेट घेत आंदोलनास पाठींबा दिला. तर शेतकरी संघटना, ग्रामसत्ता एक जुठ, एक मूठ, अजिंक्य क्रांती फाउंडेशन यांच्यासह बुधगाव, अनवर्दे, मालखेडा, वाळकी, आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी यांनीही भेट देवून पाठिंबा दर्शविला. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी रविंद्र माळी, तलाठी गजानन पाटील, कोतवाल चंद्रकांत साळुंखे, पोलीस खात्याचे प्रमोद पारधी , संजय निळे, पोलिस पाटील बापु धनगर उपस्थित होते.