मुंबई (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळं जून महिन्यातच मुंबई (Mumbai) एकदोन नव्हे, तर तब्बल 6 वेळा पाण्याखाली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यामध्ये 17 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. यात त्यांनी 26 जुलैच्या परिस्थितीचीही आठवण करुन दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याची ठिकाणं आहेत ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी २८ ठिकाणं एकाच पश्चिम विभागातील आहेत. फक्त मांटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील २५ फ्लडींग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती व्यक्त केली जात असल्याचा उल्लेख पत्रात आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्सजवळ पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत?, हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे, अशी मागणी नितेश राणेंनी म्हटलंय.
राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?, असा टोला राणेंनी लगावलाय.