जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. ज्योती राणे यांनी राजीनामा का दिला? याची समिती स्थापन करून निःपक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अँड. कुणाल पवार यांनी प्रा. कुलगुरू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणारे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचा मोठा इतिहास आहे. त्या महाविद्यालयात चालते तरी काय ? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. कारण तिथे २ वर्ष मुदत संपण्या आधीच प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य राणे मॅडम यांनी राजीनामा दिला. ही शैक्षणिक वर्तुळातील खळबळजनक बाब आहे. शांत व सयंमी मितभाषा असलेल्या आदरणीय मॅडम यांच्यावर ही वेळ का आली?. त्यांच्या राजीनाम्याला कोणती परिस्थिती किंवा कोणती व्यक्ती समूह जबाबदार आहे ?, असा प्रश्न आम्हा विद्यार्थी संघटनांना पडलाय. आपल्या अमळनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्तींने अचानक राजीनामा देणे म्हणजे त्या महाविद्यालयातील वातवरण निकोप असल्याचे निर्देशक आहे, असे सर्वांना वाटत आहे. प्राचार्य राणे मॅडम यांची महाविद्यालयातील कारकीर्द गौरवस्पद असतानाही मॅडम एवढा टोकाच निर्णय का घेतला असावा. त्यामागे काही आर्थिक राजकारण असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तसेच प्रताप महाविद्यालयाच्या बिंदु नामावलीची चौकशी झाली पाहिजे. तसेच या राजीनामा प्रकरणाची समिती स्थापन करून त्यात निवृत्त न्यायाधीश, माहिती अधिकार कार्यकर्ता यांचा समावेश करावा. तसेच चौकशी होईपर्यंत महाविद्यालय व विद्यापीठ यांनी राणे मॅडम यांचा राजीनामा मंजूर करू नये. त्याबाबत शिक्षण संचालक सतीश देशपांडें यानी देखील सदर प्रकरण चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करून एका चांगल्या प्रामाणिक कर्तव्य निष्ठ प्राचार्या सौ. राणे मॅडम यांना न्याय द्यावा, असे निवेदनात म्हंटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस सदरील प्रकरणाची विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सखोल चौकशीची मागणी करणार आहे. निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अँड. कुणाल पवार, काँग्रेसचे प्रदेश सचिव भुषण संजय भदाणे, अक्षय वंजारी, गणेश निंबाळकर, चेतन चौधरी, गौरव वाणी, अँड. अभिजित रंधे, विजय पाटील उपस्थित होते.