पाळधी : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त धरणगाव तालुक्यात काँग्रेसतर्फे आझादी गाैरव पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाने डाॅ. व्ही. डी. पाटील यांच्या नेतृत्वात पदयात्रा निघाली. रोटवदचे राजेंद्र पाटील, धरणगावचे राजेंद्र ठाकूर, शिवा महाजन, योगेश येवले, भूषण भागवत, पोखरीचे संतोष जाधव व अतुल राठोड, पाळधीचे शेख बशीर व बाळू पाटील या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाच दिवस सहभाग घेतला.
साळवा, रोटवद, साकरे, कंडारी, पिंपळे बु. व खु., निशाणे बु. व खु., नांदेड, नारणे, खर्दे, कमतवाडी, अहिरे, सोनवद, पोखरी, एकलग्न, मुसळी, चिंचपुरा, पिंप्री, पथराड बु. व खु., झुरखेडा, पाळधी खु. आदी गावांमधे नागरिकांशी कोपरासभांच्या माध्यमातून संवाद साधला. यशस्वितेसाठी धरणगाव तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश भागवत, इंदिरा विद्यालयाचे संचालक सी. के. पाटील, रतिलाल नाना, सम्राट परिहार, महेश पवार, राजेंद्र न्हायदे, दीपक जाधव, विजय जनकवार यांनी मेहनत घेतली.