नागपूर (वृत्तसंस्था) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार असल्याची माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा १५ सप्टेंबर रोजी पार पडेल असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नाराजी आहे, पण एवढीही नाही की दुसरीकडे जाऊ. ही क्षणीक नाराजी आहे. सर्वच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर वेगळी गोष्ट असती. काही मुद्द्यांना घेऊन आम्ही शिदेंना पाठिंबा दिला होता. त्यांनी काही सांगितलेले म्हणून आम्ही मागितले. शिंदेंनी मंत्रिपद देण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. मंत्री बनवितो म्हणालेले, तर बनवायला हवे होते. परंतू पहिल्या विस्तारात मिळाले नाही. पहिल्या नाही निदान शेवटच्या तरी देतील. नाही दिले तर विचार करू. मला वाटतं मी मागे पण सांगितलं होतं की, मी व्यक्तीगत हितासाठी नाराज होणार नाही. आमचे काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर आमची लढाई चालू राहिल, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती.