मुंबई (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बिहारमधील जनतेला करोनाची मोफत लस देण्याचे आश्वासनही दिले आहेत. ‘भाजपा है तो भरोसा है’ आणि ‘५ सूत्र, एक लक्ष, ११ संकल्प’ अशा नवीन घोषणाही दिल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थित ११ संकल्पांचे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. सत्तेत आल्यावर सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा दावाही केला आहे.
काय आहे भाजपाच्या जाहीरनामा ?
– बिहारच्या प्रत्येक नागरिकाला करोना लस आल्याबरोबर निःशुल्क देणार
– मेडिकल, इंजिनिअरिंगसह इतर तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेत देणार
– वर्षभरात संपूर्ण राज्यात तीन लाख नवीन अभियांत्रिकी शिक्षक भरती करणार
– पाच वर्षांत पुढच्या पिढीच्या आयटी हबमध्ये पाच लाख रोजगार.
– बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार
– एक कोटी महिलांना स्वावलंबी वचन बनवणार
– बिहारमधील दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची (एम्स) उभारणी करणार
– एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार
– धान्य आणि गव्हाबरोबरच आता सरकार डाळीही विकत घेणार
– २०२२ पर्यंत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार
– गोड्या पाण्यातील मात्सउत्पादनात एक वर्षात बिहारला पहिल्या क्रमांकावर आणणार
– दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार
यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, जोपर्यंत करोनावर लस येत नाही, तोपर्यंत मास्कच वॅक्सीन आहे. परंतु, करोनावर लस येताच भारतात त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाईल. त्या पुढे म्हणाल्या कि, भाजपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. यामुळे बिहारमधील संकल्पही आम्ही पूर्ण करू हे बिहारच्या जनतेला माहित आहे. याआधीच्या सरकारने रोजगाराला प्राधान्य दिले नाही. परंतु, भाजपचे सरकार आल्यानंतर बिहारमध्ये रोजगाराचे संधी उपलब्ध केले आहेत. यासोबतच कृषी क्षेत्रामध्येही विकास झाला आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी म्हंटले आहे.