नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक हे मुंबई-दिल्लीला जातात, अशी मुक्ताफळं दरभंगामधील कुशेश्वरस्थानचे जेडीयूचे आमदार आणि सध्या उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी उधळली आहेत.
शशि भूषण हजारी यांनी बिहारच्या जनतेबद्दल केलेले वक्तव्य सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शशि यांनी माझ्या मतदारसंघामध्ये दरवर्षी पुराची समस्या असते. मात्र येथील लोकं कामाच्या शोधात इथर राज्यामध्ये जात नाहीत असा दावा करताना दिसतात. मात्र बिहारमधील काही ठिकाणचे लोकं केवळ हौस म्हणून राज्याबाहेर जातात असं वक्तव्यही शशि यांनी व्हिडीओमध्ये केले आहे. याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या बिहारी मजुरांऐवढेच पैसे गावातील मजुरांना मिळतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे.