अकोला (वृत्तसंस्था) काँग्रेसनं आतापर्यंत एका आरपीआयच्या दहा आरपीआय केल्या आहेत. त्याच पद्धतीने भाजपला एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायचा आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय नाट्याचं दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग तसंच कॅमेरामनही भाजपचे आहेत. आता भाजपला एका शिवसेनेची दहा शिवसेना करू द्यायच्या की नाही, हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं लागेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना स्पेस मिळू द्यायची नसेल तर पुढच्या सर्वच निवडणुका त्यांना लढवाव्या लागतील. समझोत्याच्या राजकारणात न अडकता त्यांना हे करावं लागेल,’ असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं आतापर्यंत एका आरपीआयच्या दहा आरपीआय केल्या आहेत. त्याच पद्धतीने भाजपला एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायचा आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय नाट्याचं दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग तसंच कॅमेरामनही भाजपचे आहेत. आता भाजपला एका शिवसेनेची दहा शिवसेना करू द्यायच्या की नाही, हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं लागेल. ‘सध्याच्या राजकीय स्थितीत महाराष्ट्रातील जनता कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे दोन पक्षांना एकत्र येऊनच सत्ता स्थापन करावी लागते. अशा स्थितीत आम्ही शिवसेनेला सोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र शिवसेनेकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही,’ अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
















