मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जात असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केल्यांनतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जात आहे. दिल्लीच्या सरकारमध्ये काय चालू आहे हे मीडियालाही माहिती आहे, पण मीडिया ते दाखवत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र पडणवीसांविरोधात काय चालू आहे हे तुम्ही दाखवता का? असंही नाना पटोले म्हणाले. त्यानंतर फडणवीसांविरोधात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना माझ्या मित्रालाच विचारा किती चाललंय त्याच्या विरोधात असे नाना पटोले म्हणाले. तो मला सांगतो मला तुम्हाला सांगता येणार नाही, तोच सांगेल असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोलेंच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला ऊत आला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्याच्या राजकारणातच खरचं कट रचाला जातोय का? असा प्रश्न आता नाना पटोले यांच्या धक्कादायक दाव्यानंतर उपस्थित झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘साम’ टीव्हीने दिले आहे.