मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून (IMD) काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात जळगावसह ४ जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून पुढील ३ ते ४ तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. याबाबतचे वृत्त ‘मटा’ दिले आहे.