चोपडा (प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने, महाविद्यालययाचा सरासरी निकालाने ९७.४५ टक्के एवढी मजल गाठली आहे. विशेष बाब म्हणजे या वर्षी तिघही शाखांमध्ये विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे.
शास्र शाखेतून बाविस्कर महेश हुकूम ८९ टक्के, पाटील दीक्षा अरुण ८९ टक्के, पाटील रितू सतिष ८८.५० टक्के,चौधरी सृष्टी मोहन ८६.३३ टक्के तर, वाणिज्य शाखेतून अग्रवाल सिया हरिशचंद्र ९१ टक्के, जैन प्रणित पियुष ८८.३३ टक्के,अनिस हातीम कैदजोहर ८७.६७ टक्के, कला शाखेतून साळुंखे सविता भिकन ८३.८३ टक्के, पाटील आश्विनी विनोद ७९ टक्के, पाटील चेतना सोमनाथ ७७.६७ टक्के गुण प्राप्त करत शाखनिहाय अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे.
शास्र शाखेचा सरासरी निकाल ९९.२७ टक्के,वाणिज्य शाखा९७.९९% तर कला शाखेचा ९१.६६%निकाल लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष-अँड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष-आशाताई विजय पाटील,सचिव-डॉ.स्मिताताई संदीप पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, प्र.रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी,त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.
उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे,पर्यवेक्षक प्रा.एस.पी.पाटील,समन्वयक प्रा.ए.एन. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आर. आर.बडगुजर, प्रा.एन.बी.शिरसाठ, प्रा. एस.टी.शिंदे,प्रा.संदीप पाटील,प्रा.आर. आर.पवार,प्रा.राजश्री निकम, प्रा.दीपाली पाटील,प्रा.पी.व्ही. पाटील, प्रा.दीपक करंकाळ, प्रा.विवेकानंद शिंदे, प्रा.शिरीष ठाकरे आदींनी निकाल काढण्यासाठी परिश्रम घेतलेत.