भुसावळ (प्रतिनिधी) सेवा, संवाद, समर्पण, संघर्ष आणि सन्मान हा पाच तत्वावर आरोग्य सेवकांचे कार्य असून कोरोना काळात आरोग्य सेवकांनी केलेल्या कार्यामुळे कोरोना संक्रमण दर कमी झाला. असे प्रतिपादन आज भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी केले.
साई निर्मल फाउंडेशनने भुसावळ या संस्थेने भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योध्यांचा आज सत्कार सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु पाटील. पुढे म्हणाले की, कोरोना काळात स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता काम करणारे, अहोरात्र सर्वांसाठी निस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमधील कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार सम्मान पत्र, गुलाब पुष्प आणि रामरक्षा देत सत्कार माझ्या हस्ते होत आहे. हे मी माझे भाग्य समजतो. विविध क्षेत्रातील ४५५० कोरोना योद्ध्यांना कर्मवीर पुरस्कार हा ई सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे कार्य साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले असून ते कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील, ग्रामीण रुग्णालय अँड ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी, डॉ. बी एच चाकूरकर, साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे, सामाजिक कार्यकर्ते आर के कोळी, सतिश महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
सामाजिक संस्थांच्या भाऊ गर्दीमध्ये पडद्यामागे राहून निस्वार्थ सेवेने कार्य करणाऱ्या साई निर्मल फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद आणि गौरवास्पद असल्याचे तसेच रुग्णसेवा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यत सर्वाना न्याय मिळवून देणं हेच प्रत्येकाच्या जीवनाचे लक्ष असाव. असे प्रतिपादन याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. नि. तू. पाटील यांनी व्यक्त केल. याप्रसंगी पुरस्कारार्थी सुमन कसबे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. प्रास्ताविक संस्था अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले. याप्रसंगी भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी, वैद्यकीय अधिकारी बी.एच. चाकूरकर, यांच्यासह तेथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार आणि रामरक्षा देऊन सन्मानित करण्यात आले.