TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शालेय पोषण आहार भ्रष्टाचार : ‘मामा’चं पत्र हरवलं म्हणून ‘झंवर’चं फावलं ?

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराच्या भ्रष्टाचारामध्ये कंत्राटदार साई मार्केटींग या कंपनीला काळ्या यादीत टाकून एसीबीमार्फत चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याबाबत, आमदार राजूमामा भोळे यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना तक्रारी पत्र दिले होते. परंतू काळाच्या ओघात प्रशासनाने आ. राजूमामांचे पत्र हरवलं आणि त्यानंतरच सुनील झंवरचे खऱ्या अर्थाने चांगलच फावलं, अशी चर्चा सध्या सुरु आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारच्या तक्रारीनंतरही साई मार्केटींग कंपनीवर कारवाई झाली नाही आणि कालांतराने याच कंपनीच्या कार्यालयातून बीएचआरमधील १२०० कोटीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित महत्वाचे कागदपत्र पोलिसांना सापडले.

 

READ ALSO

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

आमदार राजूमामा भोळे यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये शालेय पोषण आहार भ्रष्टाचारसंबंधी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना एक तक्रारी पत्र लिहिले होते. त्या पत्रात म्हटले होते की, जळगाव जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागमार्फत शाळकरी मुलांना शालेय पोषण आहार देण्याचे काम करण्यात येत आहे. यावर्षी सदर योजनेसाठी शासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रियेमध्ये जळगाव येथील काम साई मार्केटींग या कंपनीला देण्यात आले. तथापि सदर कंपनी ही सुमारे १० वर्षांपासून कन्झुमर फेडरेशनच्या अधिरिस्थमध्ये शालेय पोषण आहाराचे काम करीत होती. सन २०१४ मध्ये जि.प. जळगावचे अधिकारी यांनी साई मार्केटींगच्या गोदामावर छापे टाकून त्यामध्ये काळबाह्य असलेला माल पकडला होता व त्यानुसार सदर कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्थापित केली होती. पण मला प्राप्त माहितीनुसार आधी जळगावमध्ये कार्यरत असलेले दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी जे सध्या मुंबईमध्ये कार्यरत आहे त्यांनी जोर लावून सदर कारवाई थांबविली होती.

 

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत हुषारीने शालेय पोषण आहाराच्या काळ्या बाजारामध्ये जाणारा तांदुळ पकडला व जि.प. यांनी त्याबाबतची चौकशी समिती नेमूण मुख्याध्यापकांवर कारवाई सुरू केली. यामध्ये मालाचा पुरवठा (वाहतूक) करणारा किरण पुंजो वाणी (रा.पारोळा) याला पोलिसांनी अटक केली आहे. वरील विवेचन पाहता सुमारे दोन वर्षांपूर्वी व आताचा भ्रष्टाचार प्रकरणी साई मार्केटिंगवर फौजदारी कारवाई होऊन भ्रष्टाचार संपविणे गरजेचे आहे व त्याला काळ्या यादीत टाकणे क्रमप्राप्त आहे. तरी आपण या संबंधीत अधिकाऱ्यांना कारवाईसाठी आदेश द्यावेत, ही विनंती. या तक्रारी पत्रावर विनोद तावडे यांनी कारवाईसाठी शेरा देखील मारला होता. त्यानंतर एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने जळगावात येऊन मोठे दप्तर जप्त करून नेले होते. परंतू त्यानंतर पुढे काय झाले?, हे कुणालाही माहिती नाही.

 

साई मार्केटिंग कंपनी बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरच्या मालकीची आहे. याच साई मार्केटिंग कंपनीच्या ऑफिसमध्ये ‘बीएचआर’शी महत्वपूर्ण कागदपत्र सापडले होते. आमदार राजूमामा भोळे यांच्या पत्रावर त्याचवेळी कारवाई झाली असती तर कदाचित आज बीएचआरमध्ये १२०० कोटीचा भ्रष्टाचार झाला नसता. सुनील झंवरच्या साई मार्केटिंग कंपनीची खऱ्या अर्थाने २०१५ नंतरच मोठी आर्थिक प्रगती झाली होती. एक विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पत्र देवून देखील झंवरच्या कंपनीवर कारवाई झाली नव्हती, उलट त्याला वेळोवेळी अभय मिळाले. याचाच अर्थ सत्ताधारी एका गटाचे झंवरला संरक्षण होते.

 

दरम्यान, जळगाव शालेय पोषण आहाराची पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार होणार असून त्यात आ. राजूमामा भोळे यांच्या तक्रारी पत्रावर कुणाच्या दबावामुळे कारवाई होण्यापासून रोखण्यात आली?, याची चौकशीची मागणी देखील होणार असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
क्रीडा

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

June 7, 2025
कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
Next Post

तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला त्यांना कसं पाठीशी घातलं, सगळे डिटेल्स देतो : अण्णा हजारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परिवहन विभागामार्फत सहा सेवा ‘फेसलेस पद्धतीने’ सुरु

June 3, 2022

कुरीअर देण्याच्या बहाण्याने अपार्टमेंटमध्ये शिरला चोरटा ; सोन्यासह रोकड लंपास !

October 5, 2023

धरणगाव महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा !

August 11, 2023

पालकमंत्र्यांच्या हस्ते महाराजस्व अभियानास प्रारंभ ! पाळधी येथून दाखले वाटून केला शुभारंभ

October 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group