रत्नागिरी (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. संचयनी ग्रुपकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणेंनी आज रत्नागिरी पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं आहे. त्यांनी अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची मागणी केली. देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचे काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचे काम करत आहेत. परवा एक घटना घडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणे धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांवरही भाष्य केले. अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट.