एरंडोल (प्रतिनिधी) “डॉक्टरांची समर्पित रुग्णसेवा सर्वार्थाने राष्ट्रसेवाच असते ” असे प्रतिपादन डॉक्टर उज्वला राठी यांनी केले.भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी एरंडोलतर्फे डॉक्टर्स डे निमित्त दि .१ जुलै २०२१ रोजी डॉ. उज्ज्वला राठी यांचा सौ. अंजुषा विसपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना डॉ.राठी बोलत होत्या.पॅथालॉजीच्या संचालिका तथा नगरसेविका डॉ. जयश्री पाटील यांचा सत्कार डॉ. उज्ज्वला राठी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सौ.मिना काळे पवार होत्या. कार्यक्रमास जळगाव जिल्हा पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. सत्कारार्थी डॉ. जयश्री पाटील यांनी मनोगतात मार्च व एप्रिल महिन्यात कोविड चाचणीसाठी रुग्णांची भितीग्रस्तता आणि तपासणीतील अविश्रांत व्यस्तता त्यात रुग्णांचे मनोबल वाढविण्याबाबत केलेले भावनिक प्रबोधनातील हृदयस्पर्शी प्रसंग सांगितले. वसंतराव नाईक यांची जयंती तथा कृषी दिनाच्या औचित्याने शेत शिवारात डॉ. उज्ज्वला ताई राठी व डॉ. जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते वड, जांभुळ, चिकू, चाफा या वृक्षांची लागवड करण्यात आली.
समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. मिना काळे पवार यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून पर्यावरण व मानसिक आरोग्य यांचे अद्वैत वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगितले. समस्त भिशी महिलांनीही वृक्ष लागवड केली.कार्यक्रमास उषा खैरनार, पुष्पा बिर्ला, श्रीलेखा सोनी, शोभा पाटील, शारदा पाटील, जयश्री विंचुरकर, संध्या महाजन यांचे अमूल्य सहकार्य लाभले. प्रस्तावना स्वाती काबरा, सूत्रसंचालन अंजूषा विसपुते व आभार प्रदर्शन क्षमा साळी यांनी केले.