जळगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीत विधवा झालेल्या महिला, निराधार बालकांना तत्काळ शासकिय योजनेत सामावुन घेण्याबाबत लोकसंघर्ष मोर्चा सोबत सकारात्मक चर्चा होवुन सेर्वेक्षणाला तहसीलदारांनी तयारी दर्शवली आहे.
तहसील कचेरी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या उपस्थितीत बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्यात लोकसघर्ष मोर्चाच्यावतीने श्रीमती शिंदे यांनी विवीध मुद्दे उपस्थीत केले. त्यात जळगाव ग्रामीण व शहरात कोरोनामुळे पती मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्वेक्षण व्हावे, अशा निराधार महिलांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत २० हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत, ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कागदपत्र उपलब्ध नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत, एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस वात्सल्य समितीने ” करावी, समृध्द गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा, ज्या महिलांकडे शेती आहे. त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सर्वांना ५० हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे, जळगाव ग्रामीण व शहरात एक पालक गमावलेल्या मुलाना तात्काळ बाल संगोपन अनुदान महिना १२५० रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ ५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी.
या वेळी तहसिलदारांनी गावनिहाय सर्वे आठ दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वाना रेशनीग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत पुढील दर १५ दिवसातून एकदा बैठका घेण्याचे आश्वासन देण्यात आले.