धरणगाव(प्रतिनिधी) स्वात्रंत्र्याचा अमृत महोस्तवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने भारत सरकार अंतर्गत ‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’चे अभियान दि.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत भारतभर राबविण्यात येत आहे. हे अभियान नुकतेच धरणगाव रेल्वे स्थानकावर सुद्धा राबविण्यात आले.
धरणगाव रेल्वे स्थानकांवर खा. उन्मेष पाटील यांचे प्रतिनिधी धरणगांव स्टेशन सल्लागार समितीचे सर्व सदस्य व डीआरयुसीसी मेंबर डब्लूआर मुंबई यांनी स्टेशनवरील प्रवाशांना तिरंगा झेंडा समितीतर्फे वाटप करण्यात आला. या अभियानाला प्रवाशी व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सर्व प्रवासी, नागरिकांनी भारत माता की जय व वंदे मातरम् , ७५ वा स्वातंत्र्य दिवस चिरायू होवो अशा घोषणासुद्धा दिल्यात. तसेच धरणगाव स्टेशन सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी नागरिकांच्या सुचना,सुविधा व समस्या,जाणून घेतल्या व रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले . याप्रसंगी धरणगाव स्टेशन सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य किरणभाऊ वाणी, सुनील चौधरी ,अनिल महाजन आनंद बाजपेयी , हिमालय सिकरवार, अॅड. संदीप सुतारे, समाधान पाटील, योगेश ठाकरे, घनश्याम पाटील, किशोर झंवर, डीआरयुसीसी मेंबर डब्लूआर मुंबई प्रतिक जैन व प्रवासी पुंडलिक पाटील, अनिल महाजन, शरद चौधरी आदी उपस्थित होते.