मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या काळात कशी दिवाळी साजरी करावी याबाबत राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे.
राज्यातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहून ठाकरे सरकारने दिवाळीसाठी नियमावली जारी केली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे खबरदारी घेत सरकारकडून नियमाली जारी करण्यात आली आहे. करोनाच्या परिस्थितीत आतापर्यंत जसं इतर सण- उत्वस साध्या पद्धतीनं साजरे केले तसेच दिवाळीचा सणही साध्या पद्धतीनं साजरा करावा असं आवाहनही यावेळी सरकारकडून करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानेच राज्य सरकारकडून पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापगी करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं व लोकांनी एकत्र न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिवाळी उत्सवही करोनाच्या काळात साजरा केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खरबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करावा.
कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विळेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी करण्याचेही टाळावे. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. जेणेकरुन करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
दिवाळी हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिवाळी उत्सवानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत दिसून येतात. करोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे.. ही बाब विचारात घेऊन नाहरिकांनी चालू वर्षी पटाके फोटण्याचे टाळावे. त्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरस मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.