जळगाव (प्रतिनिधी) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे केंद्री सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज राज्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यात जळगाव येथील माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर डॉ. उल्हास पाटील यांची करण्यात आलेली नियुक्ती ही अतिशय महत्वाची मानली जात आहे. डॉ. उल्हास पाटील यांनी आधी देखील या पदावर काम केले असून आता त्यांना नव्याने या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या महानगराध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी शामकांत तायडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हे पद रिक्त होते. आता याचीच जबाबदारी तायडे यांच्याकडे आलेली आहे.