चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या रहिवासायांच्या घरात पाणी शिरल्यामुळे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. या कुटुंबीयांची आर्त हाक ऐकून आ. राजीव देशमुख यांनी ऐक हात सहकार्याचा म्हणून किरण्याचे वितरण केले.
शहरासह तालुक्यात काल आलेल्या पाचव्या पुरामुळे नदीकाठच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून बरेच कुटुंब रस्त्यावर आले आहेत. यातील अ.बं. हायस्कुल सामोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवाशी वसंत मारसळे व कल्पना शेजवळ यांनी आज सकाळी आमदार राजीव देशमुख यांना संपर्क करून आपबीती सांगितली. पाचव्यांदा पुराचा फटका बसल्यामुळे व्यथित झालेल्या रहिवाशी बांधवांची आर्त हाक आ. राजीव देशमुख यांनी ऐकली व त्यांनी नगरसेवक रामचंद्र जाधव यांना सूचना करून तातडीने येथील बाधित कुटुंबाना किराणा पोहचविण्यास सांगितले. नगरसेवक रामचंद्र जाधव व भैय्या सूर्यवंशी यांनी त्या कुटुंबियांशी चर्चा करून आज दुपारी सुमारे २५ कुटुंबाना ऐक हात सहकार्याचा म्हणून किरण्याचे वितरण केले.
यावेळी जेष्ठ नगर सेवक सुरेशअण्णा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेहराध्यक्ष शामभाऊ देशमुख, रामचंद्र जाधव, पालिकेचे माजी उपअध्यक्ष प्रदीप निकम, माजी नगरसेवक बाळासाहेब खत्ती, भैय्या सुर्यवंशी, प्रताप भोसले, पिंप्रीचे राजेंद्र मोरे, मुरदभाई पटेल, मिलिंद शेलार, वसंत मरसाळे, रियाज भाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.