TheClearNews.Com
Friday, December 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा – पालकमंत्री पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in आरोग्य, कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा आहे. यामुळे आजचा दिवस हा बळीराजाप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस आहे. शेतकऱ्यांची स्वायत्त बाजारपेठ कशी उभी राहिल शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीने शेतीमाल कशा पध्दतीने विकता येईल, यासाठी प्रयत्नशील राहिल, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील काव्यरत्नावली चौकात सोमवारी पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

शंभु पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, शेतकऱ्यांचा राजा, समाजमिमुख राजा, जनतेचे हित जोपासणारा रजा म्हणजे चक्रवती सम्राट बळीराजा. शेतकऱ्यांसह सामान्य मनतेविषयी आपुलकी बाळगुन बळीराजा पुण्यवान झाल्यामुळे इंद्र सुध्दा घाबरला होता. मात्र वामनाने कपट नितीने बळीराजाला पातळात गाडले. तरीही हजारो वर्ष बळीराजा लोकांच्या स्मरणात राहिला. म्हणून लोक ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो असं लोक म्हणतात. त्या राजाची स्मृती म्हणजे दिवाळी सण होय. त्या राजाची आठवण म्हणून बलिप्रतीपदा सागरी करतो. म्हणून आज बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करीत आहोत असे प्रतिपादन शंभु पाटील यांनी केले.

READ ALSO

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, हा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा होय. आपला गौरवशाली इतिहास आणि पराक्रमी पुर्वज चक्रवर्ती सम्राट बळीराजाचे स्मरण करण्यासाठी बळीराजा गौरव दिनाचे आयोजन करुन सर्व जाती, धर्मातील एकत्रित येवून मानवतेचा, समतेचा आणि कृषी संस्कृतीचा जागर करण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा आहेच, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून शेतकर्‍यांबद्दल तळमळ ठेवुन शासन दरबारी मी स्वत: पाठपुरावा करेल अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

आमदार राजुमामा म्हणाले की, निसर्गाच्या ऋतू चक्रामुळे शेतकरी भरडला गेला आहे. शासन दरबारी शेतकर्‍यांच्या समस्यां संधर्भात मागण्यांचा पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या पाठिशी उमे राहु. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला दर्जेदार बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन आ. भोळे यांनी केले. महापौर भारतीताई सोनवणे म्हणाले की, निसर्गा पाठोपाठच कोरोनाच्या संर्सगामुळे शेती व्यवसायाला मोठया प्रमाणावर फटका बसला. या धक्यातून शेतकरी कसा उभा राहिल यासाठी शेतकऱ्यांची व्यथा व अडचणी दूर करण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार राजुमामा मोळे, महापौर भारतीताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंदकांत सोनवणे, परिवर्तन संस्थेचे शंभु पाटील, मजुर फेडरेशनचे पुरुषोत्तम चौधरी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष एम पवार, सुरेश पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, शंभु सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, जि.प. सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, मुकुंदमाऊ सपकाळे, ग.स. सोसायटी चेअरमन मनोज पाटील, प्रकाश पाटील, रोहिदास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुचिता पाटील, रेणुका पाटील, लक्ष्मी पाटील, मनोहर पाटील, योगेश देशमुख, प्रांताधिकारी मनोज देशमुस्व, नगरसेवक सचिन पाटील, खुशाल आप्पा चव्हाण, गोपाल दर्जी, समीर जाधव, गुलाबराव देशमुश्व, सुमित पाटील, उज्ज्वल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शंभु पाटील यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
जळगाव

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 14, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

बील अदा न झाल्याने ठेकेदाराने जि.प.च्या अधिकाऱ्यांना कोंडले !

December 7, 2025
जळगाव

जिल्ह्यतील ६५७ बालकलावंतांच्या सादरीकरणाने रंगला जल्लोष लोककलेचा

November 30, 2025
जळगाव

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये रविवारी दिवाळी मेळा, लहान विद्यार्थी बनणार छोटे उद्योजक

October 12, 2025
Next Post

आज जिल्ह्यात ४९ कोरोनाबाधित ; ५९ रुग्णांची कोरोनावर मात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपुरात कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश ; पोलिसांची नोटा मोजता-मोजताच दमछाक

March 5, 2022

डीआयजी पथकाचा एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर छापा

November 26, 2020

दुचाकीवर आलेल्या दोघांनी महागडा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

July 10, 2024

जळगावातील 33 वर्षीय महिलेवर भुसावळात अत्याचार !

May 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group