अमळनेर (प्रतिनिधी) बैलांसाठी गवत कापताना अचानक विजेचा धक्का लागल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील मुंगसे येथे रविवारी घडली. ज्ञानेश्वर बापू कोळी (वय ३३), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
मुंगसे येथील ज्ञानेश्वर कोळी हे रविवारी बैलांना चारा कापण्यासाठी सावखेडा मुंगसे रस्त्याजवळील शेतात गेलेले होते. गवत कापत असताना दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान त्याला विजेचा जबर धक्का लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यांना पुढील उपचारासाठी चोपड़ा नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, चार बहिणी असा परिवार आहे.
















