चंढीगड (वृत्तसंस्था) भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चरूनी यांनी शेतकऱ्यांना रस्त्यांवर येऊन ठिय्या आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी हिसार-दिल्ली या मार्गावरील बसताडा टोलनाक्यावर ठिय्या मांडला. मात्र, यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यातील एका शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशभरात खट्टर सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे, पोलिसांनी शेतकऱ्यांवर निर्दयी लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर, सुशील काजल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शेतकरी आंदोलनाचे सर्व अपडेट देणाऱ्या गुरनामसिंग चढूनी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. त्यासोबतच, सुशील काजल हे केवळ १.५ एकर शेतजमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी होते. गेल्या ९ महिन्यांपासून ते शेतकरी आंदोलनात सहभागी होते. मात्र, करनाल टोल प्लाझावर शनिवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर, मध्यरात्री ह्रदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले, असे गुरनामसिंग यांनी सांगितले. तसेच, आपल्या ह्या बलिदानासाठी शेतकरी जमात आपली सदैव ऋणी राहिल, असेही चढूणी म्हणाले.