जळगाव (प्रतिनिधी) दि. ९ एप्रिल २०२४ रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील. जळगाव जिल्ह्यामधून पाचशे महाराष्ट्र सैनिक पाडवा मेळाव्याला मुंबईला जाणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील जवळपास पाचशे कार्यकर्ते पाडवा मेळाव्याला रेल्वे व रस्ते मार्गाने जाणार आहेत. यंदाचा पाडवा मेळावा हा ऐतिहासिक होणार असून राज साहेब ठाकरे काय बोलतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडव्या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते शिवाजी पार्कवर पोहोचतात. जळगाव जिल्ह्यामधून पाचशे महाराष्ट्र सैनिक पाडवा मेळाव्याला मुंबईला जाणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी दिली आहे.