TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आजपासून सलग दहा दिवस ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

६ ते १६ एप्रिल २०२२ राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास अभिवादन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सर्वाना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात आजपासून सलग दहा दिवस अभिनव पध्दतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

६ ते १६ एप्रिल, २०२२ राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्य वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविल्याचे नियोजन विभागाने केले असून यासाठी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त बार्टी चे महासंचालक तसेच मुंबई श्हराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदीचा समावेश करण्यात आला आहे.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

असा असेल सामाजिक समत कार्यक्रम 
सामाजिक न्याय विभागाने ६ एप्रिल पासून सलग दहा दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असलेल्या दैनंदिन उपक्रमाचे शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार ६ एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमधून उदघाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हा स्तरावर माहिती प्रसिध्द करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे. ७ एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटय स्पर्धा आयोजित करण्यात येतील.

८ एप्रिल रोजी जिल्हा व विभाग सतरावर कार्यक्रम आयोजित करुन स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थीना प्रतिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात येईल, ९ एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्य जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील. १० एप्रिल रोजी, समता दूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाटय, पथनाटय आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल.

११ एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करुन विविध वक्त्यांना निमंत्रित करुन महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल, दि. १२ एप्रिल रोजी, मर्जिंन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थीसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करयात येतील. दि. १३ एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

दि. १४ एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्य सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीना निमत्रित करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करुन बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्याक तील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन्‍ पध्दतीने वितरीत करतील.

१५ एप्रिल, प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करुन बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करुन ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल, दि. १६ एप्रिल या अंतिम दिवशी , ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यामध्ये स्व्च्छता करणे तसेच वस्त्यामध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तीचे मनोगत जाणून घेणे आदि उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल,

सामाजिक न्यामंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात वरीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी त्या त्या जिल्हयातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्य्ज्ञक अयुक्त यांना सोपविण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वानी सहभागी व्हावे याबाबत नियोजन करण्यात आले असल्याचे माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान सदर भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे उदघाटन आज रोजी ६ एप्रिल, २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिम न्याय भवन जळगाव येथे करण्यात आले यावेळी जात पडताळणी समिती कार्यालय, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सर्व महांमडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
Next Post

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार ७ मार्च २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे’ ; पालखी मार्गावर उभारण्यात आले फलक 

June 22, 2022

क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; ट्रॅक्टर विहिरीत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू !

February 21, 2024

अर्धी मारली अर्धी बाटली कमरेला बांधून घरी निघाला, रस्त्यात घडलं भयंकर ; दारूची बॉटल फुटून पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू !

July 11, 2023

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ४ झाले बरे !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group