TheClearNews.Com
Tuesday, December 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटीत फसवणूक ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

यांच्या विरुद्ध दाखल झालाय गुन्हा

 

अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरुध्द शनी पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नाशिक येथील अशोका बिल्डर्सचे मालक अशोक कटारिया यांच्यासह पाच जणांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात ११ कोटी रुपये व १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हातउसनवारीने घेतले. त्यातील काही रक्कम या लोकांनी जैन यांना परत केली. उर्वरित ६ कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ व १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० अशी एकूण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ परत मागण्यासाठी तगादा लावला असता त्यांनी मुदतीची मागणी करुन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर राजेंद्र बुरड व स्नेहल पारख यांनी ६ कोटी ९९ लाख ७४१ रुपये देण्यास मुदत मागून जॉईंट व्हेंचर अॅग्रीमेंट तयार करु असे सांगून काही दस्ताऐवज आणले. हे दस्ताऐवज रक्कम परत करण्यास मुदतवाढीचे होते. त्यानंतर १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० च्या थकबाकीपोटी देखील संयुक्त करारनामा तयार करुन आणला.या सर्व लोकांवर विश्वास ठेऊन या करारावर आपण सह्या केल्या, असे ईश्वरलाल जैन यांनी म्हटले आहे.

 

या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, मानराज मोटर्सच्या नावानेही करार याच काळात मानराज मोटर्स कंपनीला २५ कोटी रुपये तात्काळ देणे असल्याने जैन यांनी रक्कम परत करण्याबाबत पुन्हा या लोकांकडे तगादा लावला. ही संधी साधून दोन्ही जॉईंट व्हेंचर ग्रीमेंटच्या बदल्यात तिसरा पक्ष म्हणून मानराज मोटर्सचे संचालक अशोक बेदमुथा यांना व्यवहारात आणून ३ मार्च २०१७ रोजी डीड ऑफ असाईनमेंट दस्ताऐवज या पाच जणांना बनवून आणले. आपल्या व्यवहारापोटी कटारिया हे परस्पर मानराज मोटर्सला देण्यास तयार असल्याने या करारावर जैन यांनी सही केली. त्यानंतर देखील सहा महिन्याच्या तोंडी मुदतीत रक्कम परत केली नाही. आडगाव, ता.नाशिक, विहिगाव, ता.शरणपूर, जि.ठाणे, सिन्नर व सातपूर येथील जमिनीच्याबाबत करार झालेला होता. यातील काही वाद न्यायालयात आहेत. सिन्नरची जमीन केंद्र सरकारने संपादित केलेली आहे, ही बाब देखील कराराच्यावेळी लपवून ठेवल्याचे जैन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

 

या फिर्यादीवरुन अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

 

अशोका ग्रुपच्या अधिकृत वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार – अशोका ग्रुप हा कायदेशिर व स्वच्छ व्यवहारांवर भरवसा ठेवतो. ही केस अगोदरच न्यायालयातून रद्दबातल झालेली होती. उलटपक्षी या केस मध्ये आमचीच फसवणूक झालेली आहे. प्रत्यक्षात सर्वांनाच माहीत आहे की यापूर्वी प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यानूसार माजी खा.इश्वर जैन हे आर्थीक अडचणीत असल्याचे दिसून येत होतेे. अनेक बँकांनी त्याच्याकडे शेकडो कोटी रुपयांच्या वसूलीसाठी तगादा लावल्याचे वृत्त आपणास ज्ञातच आहे. ते आपल्या संपर्काचा वापर करुन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर भरवसा आहे. त्यामूळे आम्हाला न्याय मिळेल हा पूर्ण विश्वास आहे.आमच्या चारीत्र हननाच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

December 22, 2025
जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
जळगाव

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

December 22, 2025
चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
Next Post

के पी गोसावी अडचणीत, न्यायालयाकडून 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौतुकास्पद : कोरोनाबाधित सासऱ्याला खांद्यावर उचलून नेलं रुग्णालयात

June 4, 2021

नाशिक आयजींच्या पथकाची चोपड्यात जुगार अड्ड्यावर धाड !

April 3, 2024

जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन !

March 4, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 21 मे 2024 !

May 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group