नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. भारतातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत एक योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये (दरमहा ३ हजार) दिले जातात.
पीएम किसान मानधन योजनेची पात्रता
१८ वर्षे आणि त्यावरील आणि ४० वर्षांपर्यंतचे शेतकरी या योजनेत सामील होऊ शकतात.
२ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व छोटे आणि अत्यल्प शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेंतर्गत वयाच्या ६० व्या वर्षी शेतकऱ्यांना ३००० रुपये मासिक पेन्शन मिळेल.
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला निवृत्ती वेतनाच्या ५०% कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळण्यास पात्र असेल.
कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू होईल.