मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बंदिस्त मंदिरावरुन लिहिलेले पत्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास दिलेल्या उत्तरामुळे मोठा वाद रंगला आहे. राज्यपालांविरोधात आता महाराष्ट्र सरकारचा वाद राष्ट्रपतींच्या दरबारात जाण्याची शक्यता आहे. कारण राज्यपाल राज्यपालांची नेमणूक करण्याची शिफारस राज्यपाल करू शकतात.
राज्यपालांना घटनात्मक अधिकार आहेत की ते मुख्यमंत्र्यांकडे उत्तरं मागू शकतात, ज्याची समाधानकारक उत्तरं देणं मुख्यमंत्र्यांना भाग असतं. राज्यपाल राष्ट्रपतींना सांगू शकतात की राज्याशी संबंधित प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने राज्यातील राजकीय परिस्थिती आलबेल नाही. त्यामुळे राष्ट्रपतींनी राज्याचा कारभार हाती घ्यावा, अशी शिफारस राज्यपाल करु शकतात.