जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे तापमान ४३ ते ४७ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरीक, कामगार, विद्याथ्यांना त्रास होऊ नये म्हणून कामाच्या व क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे जिल्हाधिका-यांनी सूचित केले आहे. किंबहुना, त्यांनी २५ मेपासून ते ३ जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.
कामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेसे शेड तयार करणे, कुलर किंवा इतर साधने पुरवण्याची जबाबदारी संबंधित प्रतिष्ठान, कंपनी मालकांची राहिल. खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी ० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. त्यानंतरही क्लासेस सुरू ठेवायचे असतील तर पुरेसे पंखे, कुलरची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिले आहेत.