मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांना तूर्तास दिला आहे. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे यांना नोटीस दिली जावी.
“माझ्यावरील आरोपांविषयी एनसीबीच्या तपास पथकाकडून आधीच चौकशी सुरू झाली आहे. मग मुंबई पोलिसांच्या स्वतंत्र विशेष तपास पथकाची आवश्यकता काय? मुंबई पोलिस मला लक्ष्य करेल. त्यामुळे सीबीआय किंवा एनआयएकडे तपास द्यावा, अशी विनंती समीर वानखेडे यांनी याचिकेतून केली आहे. त्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना “समीर वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोटीस देऊ” असे सांगितले. हे सरकारी वकिलाने सांगितल्याने न्यायालयाने याचिका निकालात काढली. तूर्तास राज्य सरकारने कुठलीही कठोर कारवाई करू नये आणि अटक करायची असेल तर तीन दिवसांपूर्वी कळवावे, असं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना राज्य सरकारच्या कारवाई तूर्तास का होईना दिलासा मिळाला आहे.