मुंबई (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने काल संजय राऊत यांची काल तब्बल १० चौकशी केली. या चौकशीबाबत बोलताना आज राऊत म्हणाले की, ‘काल मला भाजपच्या एका शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं. माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, मात्र मी ईडी चौकशीला सामोरे गेलो. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी बॅग भरून आलो आहे, असं ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तब्बल १० तासापासून ईडीकडून चौकशी सुरू होती. महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा सुरू असतानाच राऊत यांना ईडीचं दुसरं समन्स आलं होतं. त्यांचा अलिबाग दौरा असल्याने चौकशीच्या समन्सला प्रत्युत्तर दिलं होतं. अखेर राज्यात नवं सरकार आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊत यांनी सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात हजेरी लावली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यांशी बोलताना सांगितले की, मी कपड्याची बॅग भरून आल्याचं राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. ही जमीन कुठे आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, असं ते म्हणाले.
शिंदे गटाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण चूक केली आहे, आपण फसलो आहे, हे लक्षात आल्यामुळे बंडखोर गटाकडून असे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, हे कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे,’ असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावरून संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. ‘आमदार आणि खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसैनिक कोणत्याही दबावाला आणि मोहाला बळी पडणार नाही. राज्यसभा निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र पराभूत झालो असतो तरी मी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ही दोन्ही नावे एकाच नाण्याच्या बाजू,’ असं राऊत म्हणाले.