अमळनेर(प्रतिनिधी) सन २०१४ पासुन केंद्र सरकारने कायम शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर केंद्रशासनाने पारित केलेले कृषी विधेयक तात्काळ लागू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन किसान मोर्चा यांच्या वतीने तहसीलदार यांना आज देण्यात आले आहे.
मग त्यात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचा अभ्यास करुन आवश्यक ते निर्णय घेत आहेत. त्यातच आता कृषि क्षेत्राला संजीवणी देणारे कृषि विधयेक केंद्र सरकारने मंजुर केले आहे या विधेयकाच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांचे बरेच जटिल प्रश्न सुटणार आहेत.यात शेतक- यांस केंद्रस्थानी ठेवुन अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. परंतु राज्यशासन केंद्र सरकारने मंजुर केलेले कृषि विधेयक राज्यात लागु करण्यास स्थगिती देवून पुर्णतः शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. सदर विधेयकात सर्व निर्णय शेतकरी हिताचे असतांना राज्यशासन आढमुठे निर्णय घेत शेतकर्यांवर अन्याय करीत आहे. तरी सदर कृषि विधेयक राज्यशासनाने तात्काळ राज्यात लागु न केल्यास शेतक-यांमध्ये मोठा असंतोष निर्माण होवून मोठे आंदोलन केले जाईल.तेव्हा राज्यातील शेतक-यांचा भावनांचा आदर करुन शेतकरी हिताचे विधेयक असलेले कृषि विधेयकास तात्काळ राज्यशासनाने राज्यात लागु करावे अश्या भावना आपल्या भाषणात तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व व्हि आर पाटील यांनी व्यक्त करीत ह्या मागणीसाठी अमळनेर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी अॅड व्ही आर पाटील,विधि प्रदेश कार्य.सदस्य,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील,विजय राजपूत,राहुल पाटील,सभापती प्रफुल्ल पवार,माजी सभापती श्याम अहिरे,संचालक पराग पाटील,राहुल पाटील,निवास मोरे,शितल देशमुख,महेंद्र बोरसे, चंद्रकांत कंखरे,महेंद्र पाटील,गिरीश पाटील, दिलीप पाटील,तुळशीराम हटकर,संजय एकतारे, देवा लांडगे,भास्कर पाटील,गुलाब पाटील, किसान मोर्चा जिजाबराव पाटील,मच्छीन्द्र पाटील,युवा मोर्चा योगीराज चव्हाण, पंकज भोई,दिपक पाटील, कल्पेश पाटील, घनश्याम पाटील,राकेश पाटील, सागर मोरे,समाधान पाटील,अभिषेक पाटील,शेखर कुलकर्णी,ओ बी सी मोर्चा दिपक पाटील,बाळा पवार,सुमित हिंदुजा,सौरभ पाटील,निनाद जोशी,निखिल पाटील,