जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जुन्या जळगावातील वीर जवान गृपचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ पाटील यांच्या सोबत तब्बल ५० तरुण कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश भाऊ महाजन, जळगाव शहराचे आमदार तथा जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे (राजुमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्री राम, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टी, घोषणा देऊन प्रवेश केला. या प्रसंगी अरविंद देशमुख, युवा मोर्चाचे जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, भूषण भोळे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.