नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली. गेल्या २४ तासांत २५ हजार ४६७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३५४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची २५ हजार ४६७ नव्या रुग्णांची भर पडली असून ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ३९ हजार ४८६ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात २५,०७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती, तर ३८९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील सध्याची कोरोनास्थिती
कोरोनाची एकूण आकडेवारी : ३ कोटी २४ लाख ७४ हजार ७७३
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : ३ कोटी १७ लाख २० हजार ११२
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : ३ लाख १९ हजार ५५१
एकूण मृत्यू : ४ लाख ३५ हजार ११०
एकूण लसीकरण : ५८ कोटी ८९ लाख ९७ हजार ८०५ लसीचे डोस
राज्यातील स्थिती
राज्यात काल ३ हजार ६४३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ३८ हजार ७९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. राज्यात काल १०५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे.