नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत देशात कोरोनाचे ७५,८२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९४० जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (४ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोरोनाचे ७५,८२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९४० जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६५ लाख ४९ हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात आतापर्यंत ७० लाख ३५,२९६ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी २०.३४% जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी दिवसभरात १६,८३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ११ लाख ३४,५५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ७९.३ टक्क्यांवर पोहोचला आहे.