जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सामरोद येथील बेपत्ता बालक सचिन पेठे (१४) याचा मृतदेह स्मशानभूमी जवळील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सचिन हा गेल्या आठवड्यात गायी चारण्यासाठी घराबाहेर पडला असता परत न आल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. तो आढळून न आल्याने त्याचे अपहरण केल्याचा संशयावरून त्याच्या आईने पोलिसात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. तपासासाठी पोलिसांनी श्वानपथक आणले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर पाच दिवसानंतर सचिनचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गूढ वाढले असून जामनेर पोलीस पुढील तपास कसून करत आहेत.