वर्धा (वृत्तसंस्था) कृष्ण नगर येथे वास्तव्यास राहणाऱ्या महिलेच्या घरातून जावयाने सोन्याचे दागिने व कागदपत्र चोरून नेल्याची तक्रार निर्मला नारायण ताकसांडे (वय ६६) यांनी रामनगर पोलिसांकडे नोंदविली.
कृष्ण नगर येथे किरायावर घर घेऊन वास्तव्याला राहतात. घटनेवेळी महिला कामावर गेली होतक. नातू घरी असल्याने घराचे दार उघडे होते. ती घरी परतली तेव्हा तिचा जावई धीरज भीमराव जयपूरे हा प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जाताना आढळून आला. महिलेने त्याला आवाज दिला. काय चोरून नेत आहे, अशी विचारणा केली. महिलेला धक्का देऊन जावई निघून गेला. नंतर महिलेने घरात जाऊन पाहणी केली असता लोखंडी पेटीमधील कपडे अस्ताव्यस्त पडून होते.
एका लहान पर्समध्ये ठेवून असलेली सोन्याची अंगठी, सोन्याचे मनी असलेली पोत पदकासह, एक सोन्याची साखळी व इतर लहान वस्तू असा ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे आढळले. त्यासोबतच महत्त्वाचे कागदपत्र दिसून आले नाही. चोरी करणारा जावई धीरज हा नागपूर येथे वास्तव्याला राहतो. त्याला वारंवार दुरध्वनी करून बोलविण्यात आले. तो न आल्यामुळे महिलेने रामनगर पोलिसांकडे चोरीची तक्रार नोंदविली. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.