TheClearNews.Com
Saturday, November 15, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीम यशस्वी मुंबईत मोहीमेची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगता

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वाण, आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, पिक उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा सहभाग, पिकांवरील किड व रोग नियंत्रण उपायोजना यासारख्या कृषि उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि. २१ जून २०२१ ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडली.

दि. १ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून या कृषी संजीवनी मोहिमेचा सांगता कार्यक्रम सह्याद्री, राज्य अतिथी गृह, मुंबई येथे दु.१२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समारंभ पार पडला.

READ ALSO

प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी मनीषा चौधरी यांची निवड

जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा

कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक येथून थेट प्रक्षेपणाद्वारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम आणि फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे उपस्थित होते. या प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प संचालक विकास रस्तोगी हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय रब्बी हंगाम २०२०-२१ हंगामातील पीक स्पर्धेत गहू, हरभरा, रब्बी ज्वारी आणि करडई या पिकांमध्ये प्रथम क्रमांकाचे उच्चांकी उत्पादन घेतलेल्या सर्वसाधारण व आदिवासी गटातील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय पिकस्पर्धा विजेत्या शेतक-यांनी अंगिकारलेल्या तंत्रज्ञानाच्या पुस्तिकेचे आणि नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये कृषि संजीवनी मोहिम संकल्पना व अंमलबजावणी बाबत कृषीमंत्री दादाजी भुसे, यांनी सांगितले की, दरवर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून दि. १ जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी १ जुलैपुर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ जून ते १ जुलै २०२१ कालावधीत कृषि विभागात राबविण्यात येणा-या विशेष मोहिमांवर भर देऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा कृषी विभागाने यशस्वी प्रयत्न केला.

दिनांक २१ जून २०२१ ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहिमेदरम्यान राज्यातील ३५४९७ गावांमध्ये प्रशिक्षणे/सभा/ प्रात्यक्षिके/वेबिनार /शेतीशाळा/ शिवार फेरी या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये ७,५२,२३० शेतकरी उपस्थित होते तसेच उपस्थित मार्गदर्शकांमध्ये ७३७ शास्त्रज्ञ, २७,६२० कृषी विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, ११२०९ रिसोर्स बँकेतील शेतकरी आणि ५७,७६० प्रगतिशील शेतकरी तर ३५,४४६ लोकप्रतिनिधी/पदाधिकारी उपस्थित होते.

तद्नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथून थेट प्रक्षेपणाद्वारे तर कार्यक्रमामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृषि विभागामार्फत करत असलेल्या कामगिरीबाबत कृषि विभागाचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले. शेवटी कृषी राज्यमंत्री, डॉ.विश्वजित कदम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा शेवट केला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चैनल www.youtube.com/C/ AgricultureDepartmentGoM वरून करण्यात आल्याने राज्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदरचा कार्यक्रम पोहचला. असे अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी मनीषा चौधरी यांची निवड

November 14, 2025
जळगाव

जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा

November 14, 2025
गुन्हे

झटपट श्रीमंतीचा मोह पडला महागात ; व्यावसायिकाला ४४ लाखात गंडवले !

November 14, 2025
गुन्हे

महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा संदेश

November 13, 2025
गुन्हे

शासकीय जागेत शिंदे गट पक्षाचे कार्यालय – ॲड.पियुष पाटील यांची मनपा आयुक्तां कडे तक्रार

November 12, 2025
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदली करीत शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे लंपास

November 12, 2025
Next Post

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन राज्यस्तरीय बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पालिकेचा ‘तो’ ठराव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीला सुरुवात !

November 11, 2020

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

July 25, 2021

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक

May 25, 2022

जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण

January 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group