जळगाव (प्रतिनिधी) येथील के.के. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी विविध कार्यक्रमा द्वारे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे निरोप समारंभीय कार्यक्रम संस्थाचे अध्यक्ष अलहाज डा अमान उललाह शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषा शिकण्याचे महत्व सांगुन विविध भाषान वर प्रभुत्व प्राप्तीचे राजमार्ग थोडक्यात दाखविले.
प्रमूख अतिथी मराठी हिंदी चित्रपट नट सुहास पणशीकर यांनी मराठी भाषे महत्व व्यक्त करुन याचे संवर्धन करण्यासाठी साहित्यिक, कलाकार तथा शिक्षकवृन्दानी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे व्यक्त केले. बहु भाषिक साहित्यकार विचार वंत डा. रफिक अहमद राही यांनी ही भाषा अर्जनाचे महत्त्व व्यक्त करून बहारदार मराठी भाषेत उर्दू काव्य पध्दतीची हमद व नात सादर करुन उपस्थिताना मंत्र मुग्ध केले. प्रा.अस्लम तैय्यबी यांनी राज्यामध्ये हा पंधरवडा साजरा का करावा लागत आहे? याची पार्श्वभूमी सादर करुन भाषा चे महत्त्व व्यक्त केले. प्राचार्य अकिल खान बियावली यांनी शिक्षण व ज्ञानार्जन मध्ये भाषा चे महत्त्व व्यक्त करून जास्तीत जास्त भाषा अवगत करण्या चा सल्ला दिला. विद्यार्थीनिनीही कविता, गजल, नाटिका सुविचार सादर केल्यात. प्रस्तावना मराठी भाषा मंडळाच्या नसरीन काद्री यांनी सादर केली. मझहरोदीन शेख, शाह झाकीर, यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी तबरेज शेख ने हमद सादर केली. जाहिद भाई शाह सदस्य ए.के.के.पाहुणे म्हणून उपस्थित होते. यशस्वीतेसाठी साठी मुश्ताक भिसती, इम्रान खान, असमा शेख, अब्दुल कय्युम शेख, तन्वीर शेख, नाजिया शेख यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेतर आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.