TheClearNews.Com
Friday, June 13, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शब्दाला जागणारा नेता.. बाबूजी उर्फ ईश्वरलाल जैन..!

वाचा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांचा अभिष्टचिंतनपर लेख !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2022
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) स्वातंत्र्यानंतर सत्तरच्या दशकात राजकीय क्षेत्रात आलेल्या राजकारण्यांमध्ये माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर स्वतःचा जो ठसा उमटविला, तो लौकिकार्थाने एक दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. बहुतांश कार्यकर्ते पद, प्रतिष्ठा मिळावी म्हणून राजकारणात येतात. परन्तु बाबूजी पद, प्रतिष्ठेपलीकडे जाऊन विचार करणारे व्यक्तीमत्व. पदापेक्षाही स्वतःचं व्यक्तिमत्व एवढं मोठं निर्माण केलं, की पदाला त्यांच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली.. निर्मळ, स्वच्छ प्रतिमा, कणखरपणा अन् निस्वार्थ भाव अशा या चारित्र्यसम्पन्न, स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस, आपल्या वयाची 76 वर्षे पूर्ण करून 77 व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या बाबूजींचं त्यानिमित्त अभिष्टचिंतन…!

जिल्ह्यच्या राजकारणात जेव्हा माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील, बाळासाहेब मधुकरराव चौधरी, बापूसाहेब के. एम. पाटील, अनिलदादा देशमुख हे जिल्ह्यात अग्रणी नेते म्हणून असतानाच श्री बाबूजींनी आपली राजकीय फळी स्वकर्तृत्वावर निर्माण करीत स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. त्यासाठी राज्य अथवा राष्टीय नेत्यांचे उंबरठे त्यांंनी कधीच जिझवले नाहीत. त्यापेक्षा राष्ट्रीय पक्ष व नेतृत्वाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे सुरवातीच्या काळात थेट इंदिरा गांधींपर्यंत पोहचत आपलं महत्व निर्माण केलं, तर महाराष्ट्राच्या पातळीवर शरद पवार यांच्याशी व्यक्तिगत मैत्री द्वारे आपली योग्यता पवारांकडे प्रस्थापित केली. अशी किमया एका अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीने स्वबळावर निर्माण करणे, हे देखील राजकीय क्षेत्रातील दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. आमदार, खासदार ते जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वतःच्या हिमतीवर मिळवणाऱ्या बाबूजींनी राजकारणात तडजोड किंवा लाचारी कधीच पत्करली नाही. विचारांची स्पष्टता, प्रामाणिक वृत्ती आणि कणखरपणा ही वृत्ती आयुष्यभर जोपासली, ही बाब देखील राजकारणातील अफलातून अशीच म्हणता येईल. त्यांचा स्पष्टवक्तेपणा व निडरतेचं एक उदाहरण मुद्दाम येथे देत आहे. बहुधा सन 1978-79 ची ही घटना असावी, शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी बाबूजींनी पुढाकार घेत तीस आमदारांचे एक शिष्ठमंडळ दिल्लीला इंदिरा गांधी यांच्याकडे ते घेऊन गेले, श्रीमती गांधी यांची भेट घेत पवारांना मुख्यमंत्री करण्याची विनंती केली असता, तुम्ही संजय गांधींना भेटलात का? असा प्रश्न इंदिरा गांधी यांनी केला असता श्री बाबूजी म्हणाले, आपण आमच्या अध्यक्षा आहात, तेव्हा केवळ तुम्हांकडेच मांगणी केली, अन्य व्यक्तीस भेटीचा विचारच येत नाही…

READ ALSO

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस…
त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास काँगेस ते राष्ट्रवादी असाच राहिला, पण या प्रवासात त्यांनी पदासाठी पक्ष नेतृत्वाकडे याचना केली नाही, की शिष्टमंडळे नेली नाहीत. उलट इतरांना स्वतःची प्रतिष्ठा खर्च करून उमेदवारी मिळवून दिली. त्यात प्रामुख्याने जामनेरचे बाबूसिंग राठोड, दत्तात्रय महाजन आदींचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेत त्यांचाही महत्वाचा वाटा राहिला आहे. राज्यात जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचं सरकार 1999 मध्ये अस्तिवात आलं, त्या वेळी शरद पवारांएवढंच त्यांच्या शब्दाला महत्व होतं.

नेत्यांशी मित्रत्व…
बाबूजींचा राजकीय मित्रपरिवारही समृद्धच म्हणावं लागेल. गुलाम नबी आझाद, हमीद अन्सारी, राजस्थांनचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत, तसेच कै. अरूण जेटली यांचेशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते. राज्यसभा सदस्य असताना त्यांनी अनेक महत्वाचे विषय संसदेत मांडले. त्यातील मुंबईचा मुद्दा लगेच मान्य केला गेला. बाबूजींनी राज्यसभेत बॉम्बेचं मुबंई केलं गेलंय रेल्वे, विमानतळ आदी सर्व ठिकानी बदल केले गेले, मात्र बॉम्बे हायकोर्टाचं मुंबई हायकोर्ट का होत नाही, असा प्रश्न केला असता तो तत्काळ मंजूर झाला…

पत्रकार म्हणून मी बाबूजींना 1988 पासून जवळून बघितले आहे. एक निर्मळ व्यक्तिमत्व पण त्याच बरोबर धाडसी वृत्ती, आर्थिक श्रीमती असली तरी, मनाच्या मोठेपणाचीही श्रीमंती मी अनुभवली.. राजकारणाच्या दिर्घ प्रवासात या व्यक्तीने कधीही सवंग लोकप्रियतेसाठी प्रयत्न केला नाही, की कधी कुणाचं वाईट ही चिंतले नाही. ते आता सक्रिय राजकारणात नाहीत आशा या स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्वास या निमित्ताने पुढील वाटचालीस शुभेच्छा…

सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

June 13, 2025
जळगाव

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

June 13, 2025
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

June 13, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

June 12, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

June 12, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
Next Post

मंकीपॉक्स विषाणूचे पडसाद : सोनं महागलं तर चांदीत घसरण ; जाणून घ्या..लेटेस्ट रेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चा ळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले !

May 7, 2025

गुलाबराव पाटलांशी शेकडो मुस्लीम बांधवांचा संवाद तर साळवा येथील युवकांनी हाती घेतला भगवा !

October 25, 2024

जळगाव जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ६७६ कोटी जमा !

June 12, 2024

जयश्रीताई धाडीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विधवा निराधार महिलांना शिलाई मशीन भेट !

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group