चाळीसगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या “मतदार याद्या शुद्धीकरण” (SIR) अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष समितीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे.
या समितीत युवा, अभ्यासू आणि संघटननिष्ठ नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बूथ स्तरापासून जिल्हा पातळीपर्यंत मजबूत संघटन उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या काटेकोर नियोजनशैलीमुळे आणि कार्यतत्परतेमुळे SIR मोहिमेला राज्यभर अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
मतदार याद्यांतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव समाविष्ट व्हावे आणि अपात्र नावे वगळली जावीत, या उद्देशाने ही समिती निर्णायक भूमिका बजावणार आहे. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती म्हणजे पक्षाने तरुण नेतृत्वावर दाखवलेला विश्वास असून, त्यांच्या माध्यमातून पारदर्शक आणि शिस्तबद्ध मोहिम राबवली जाईल.
प्रदेश चिटणीसपदी मंगेशदादा चव्हाण यांची नियुक्ती
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनेत मंगेशदादा चव्हाण यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या परिश्रम, प्रामाणिकपणा आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच मतदार याद्या शुद्धीकरण (SIR) विशेष समितीतही त्यांची निवड करण्यात आल्याने राज्यस्तरावर प्रभावी भूमिका बजावण्याची संधी त्यांना मिळाली आहे. संघटन कौशल्य, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेले जवळचे नाते ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये मानली जातात.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन आणखी बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल अमित एकनाथ पाटील व नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी मा. मंगेश दादा चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















