भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने कोरोना संक्रमण, सतत होणारी संचारबंदी आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता,”इंफ्लूएन्झा लस सरसकट सर्व लहान मुलांसाठी किमान पुढील एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्राने करोना संक्रमण महामारीची पहिली लाट अनुभवली असून आता दुसऱ्या लाटेसोबत लढाई सुरु असून संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पूर्वतयारी सर्वस्तरावर सुरु आहे. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट ही प्रामुख्याने लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात असून पालकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्र टास्क समिती आणि पेडीयाट्रिक टास्क फोर्से ने मान्सूनपूर्व सर्व मुलांना इंफ्लूएन्झाची लस देण्याबाबत सूचना केली आहे. यामुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी राहील आणि अनावश्यक चाचण्या रोखण्यास मदत होईल. इंफ्लूएन्झाचे दोन प्रकार असून त्यांचे परत दोन उपप्रकार आहेत. या लसीचे डोस मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. शिवाय या लसीच्या एका डोसची किंमत १,५०० ते २,००० रुपये अशी आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत सदर लसीकरण येत नसल्याने पालकांना हा अधिकचा खर्च पेलावा लागत आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना संक्रमण, सतत होणारी संचारबंदी आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता,”इंफ्लूएन्झा लस सरसकट सर्व लहान मुलांसाठी किमान पुढील एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी यात केली आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत सदर लसीकरण येत नसल्याने इंफ्लूएन्झा लस सरसकट सर्व लहान मुलांसाठी किमान पुढील एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्यावी आणि कोरोना पर्वात नागरिकांना दिलासा द्यावा. अशीही मागणी डॉ. नितु पाटील यांनी केली आहे.