जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर मुलींच्या वडिलांना शिवीगाळ करून चापट्या बुक्क्यांनी मारहाण देखील करण्यात आलीय. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात आकाश समाधान सुरवाडे व आनंदा समाधान सुरवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, आकाश समाधान सुरवाडे व आनंदा समाधान सुरवाडे यांनी १७ वर्षीय मुलगी व तिची बहीण असे शौचालयास कांग नदिजवळ जात असतांना दोघींचा पाठलाग केला. त्यानंतर यातील आकाश याने १७ वर्षीय मुलीची ओढणी ओढली. त्यानंतर तिच्या लहान बहीणसुद्धा तिच्यासोबत होती. तेव्हा आकाशने लज्जा वाटेल असे वक्तव्य केले. याबाबत दोघी बहिणींनी घरी गेल्यानंतर सदरची घटना तिचे वडीलांना सांगितली. मुलीचे वडील आकाश व आनंदा यांना बोलण्यास गेले असता दोघांनी वडीलांना शिवीगाळ करुन चापटाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात आकाश समाधान सुरवाडे व आनंद समाधान सुरवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सपोनि दिलीप मनोहर राठोड हे करीत आहेत.