चोपडा (प्रतिनिधी) नैतिकता हि नुसती सांगायची नसते, तर ती प्रत्यक्ष आत्मसात करुन आचारणात आणायची असते, असे सूचक वक्तव्य विकास महाराज पाटील यांनी तावसे बु॥ ता. चोपडा येथे सुरु असलेल्या पुण्यतिथि कीर्तन महोत्सव प्रसंगी केले. नैतिकता आणि माणूसकी त्यानुसार जीवनाची वाटचाल करावी लागते. जीवनामध्ये पैसा सर्वस्व नाही. पैसा आवश्यकच आहे, परंतु नितीने मिळवलेल्या पैशात बरकत असते. अशा माणसाच जीवन सुखी होत असते. असे ही ते म्हणाले.
तावसे बु येथे सुरु असलेल्या पुण्यतिथी कीर्तन महोत्सवातून ह.भ.प. विकास महाराज पाटिल यांनी मनुष्य कुठ्ल्याही क्षेत्रात असो, राजकिय क्षेत्रांत, धार्मिक क्षेत्रात, शेतकी क्षेत्रात किंवा नोकरी क्षेत्रात असो, नैतिकतेची नितांत आवश्यकता आहे. नैतिकता ही संस्काराच्या माध्यमातून संपन्न होत असते आणि संस्काराचे बाळकडू आईवडीलांकडून प्राप्त केले पाहिजे. तसेच वैकुंठवासी मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांच्या पुण्यस्मरणानिमीत्त चालू असलेल्या कीर्तन महोत्सवात ह.भ.प. विकास महाराज पाटिल यांनी “आपुलिया हिता जो असे जागता” या तुकोबारायांच्या अभंगावर निरुपण करताना मातापितांना धन्यता देताना जो आपल्या नैतिकतापूर्वक हिताला जागृत असतो त्याचच जीवन सार्थकी लागते.त्यांनी विविध उदाहरण व दाखले देऊन नैतिकता जीवनात कशी व किती महत्वपूर्ण आहे हे पटवून दिले.
कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनाची पार्श्वभूमी पाहता श्रोते विना तीन दिवशीय कीर्तन महोत्सव सुरु आहे . मंदोदरी अमृत चौधरी यांच्या पुण्यतिथि निमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आळदी वारकरी सम्प्रदायचे सचिव नरहर महाराज चौधरी , अशोक अमृत चौधरी व धनराज अमृत चौधरी यांनी आपल्या मातोश्रीच्या पुण्यतिथि प्रीत्यर्थ किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.