धरणगाव (प्रतिनिधी) ‘जागर स्त्री शक्तीचा’ हे दरवर्षी चालणारं अभियान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने महाराष्ट्रात आयोजित करण्यात येते. या अभियान निमित्त आज सोमवार रोजी धरणगावातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘नवरंगी संवाद’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात झाला.
महिलांनाच नव्हे तर समस्त लोकांना आजकाल नवरात्रात नऊ दिवसात एका रंगाची क्रेझ असते, हे आपण गेली काही वर्षे पाहत आलोय. रंग आलेत कुठून, त्याने मार्केटिंग कस होतं ? हे आपण या अभियानात सांगत असतो. रंग शब्द टाळणं, नवरंगी म्हटलं की रंगाचं उदात्तीकरण किंवा समर्थन करणं असा अर्थ नसून त्याच रंगाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधून संवाद होऊ शकेल अशी भूमिका यातून असल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्यवाह डीगंबर कट्यारे यांनी सांगितले. विद्यार्थिनींनी यावेळी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवीत त्यांच्या मनात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी असलेली प्रश्न दिल खुलासपणे मांडलेत. प्रसंगी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यावाह डीगंबर कट्यारे यांच्यासह धरणगाव येथील कार्यकर्ते जितेंद्र महाजन, विद्यालयाच्या शिक्षिका कविता महाजन, नेत्रा पवार, रेखा पवार व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.